जुन्या शिक्षणाची नवी दिशा...




जुन्या शिक्षणाची नवी दिशा...


     मानव विकासच महत्त्वाचं साधन म्हणजे शिक्षण होय... म्हणूनच शिक्षण देणे म्हणजे मानव संसाधन चा विकास करणे होय..

    देशाची संपती(भांडवल), हे त्या देशाचे नागरिक असतात.. यामुळेच सरकार शिक्षणात गुंतवणूक करत असते...कारण त्यांना सुजाण नागरिक ,संवेदन शिल मन असणारे नागरिक घडवायचे असतात
मात्र , असे करत असताना शिक्षणाचं धोरण हे सुयोग्य, काळा नुसार बदल आत्मसात करणार असावं...
ही मागणी अनेक वर्ष जोर धरत होती. सरतेशेवटी २०२० उजडावे लागले...

    आपल्या शिक्षण पद्धतीत काही दोष होते...जसे की , न समजताच करावे लागणार पाठांतर, विद्यार्थ्याला विचार करण्या पासून परावृत्त करनाऱ्या पद्धती, अंगभूत गुणा पेक्षा निकाल पत्रा मधील गुणा ला अतिमहतत्व देणं , कला शाखेला कमी महत्व ..इत्यादी..

    असो दोष कितीही पण शिकवलं या व्यवस्थेने..! माणूस आपल्या चुकामधूनच शिकतो हे सकारात्मक मूल्य सुध्धा मला याच व्यवस्थेने शिकवले. आपण चुकलो हे सत्य स्वीकारा हेच तर शिकवलं बुद्ध आणि जैन धर्मा ने .म्हणून काय सरकार ने आपल्या चुकीला सुधारायचे ठरवले...लोकमान्य टिळकांच्या शब्दात सांगायचे म्हटलं तर.." सरकार च डोक ठिकाणावर येत आहे..!"

    सरकारनं नवं शैक्षणिक धोरण २०२० जाहीर केले.. या मध्ये अनेक समितीच्या शिफारशीनचा ( टी एस र सुब्रमण्याम , वैज्ञानिक कस्तुरी रंजन समिती इत्यादी) समावेश करण्यात आला आहे... मातृभाषेतून विद्या शिकवावी हे अनेक अभ्यासकांनी कळकळीने सांगितलं... इंग्रजी भाषा पण आवश्यकच आहे. पण ती भाषा म्हणून शिकावं सुरवातीला .. नाकी अभ्यासा चे माध्यम... भाषा आणि माध्यम या मध्ये आपण फरक करायला शिकलं पाहिजे.. इंग्रजी भाषेत सुध्दा ज्ञान आहे .. त्यामुळं तिला ही वया नुसार आत्मसात करण्यात गैर काय?
नव्या धोरणात मातृभाषेत वर भर , प्रोग्राम, गणित कौशल्य .,कला यावर भर देण्यात आला आहे... मुलाचं पूर्व प्राथमिक शिक्षण महत्वाचे असते... मुलांच्या बुध्दीचा विकास साधारण पने ५ते ६ वर्षा पर्यंत अधिक वेगाने होत असतो अस बालविकास तज्ञाच म्हणणं आहे. त्यामुळं च पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व या धोरणात अधोरीखीत करण्यात आले आहे.

    शिक्षण हे समवर्ती सूचीतील विषय असल्याने राज्य आणि केंद्र या दोघांची भूमिका कळीची ठरणार आहे.राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जर हातात हात घालून प्रयत्न केले तर सहकारी संघराज्य वाद खऱ्या अर्थाने अंमलात येण्यास चालना मिळेल.. आणि आपले उद्दिष्ट लवकरच गाठू या बाबत तीळ मात्र शंका नाही.... लवकरच याची परिणीती आपल्या समोर येईल...आणि हे धोरण विद्यार्थ्याला काय विचार करण्यापेक्षा विचार करायला प्रवृत्त करेल....

आणि विद्यार्थी प्रश्न विचारतील शिक्षकांना आणि कालांतराने प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला...की अजून, का सामाजिक न्याय समाजात नांदू शकला नाही?

    याचाच परिपाक म्हणून समता व्युक्त समाज निर्माण होण्यास , सहिष्णुता समाजात रुजण्यास सकारात्मक वातावरण तयार होईल..आणि सर्व घटक म्हणून एकत्र येऊन राष्ट्रा पुढील आव्हानाना समोर जाण्यास आपण सज्ज होऊ. मला खात्री आहे की, आपला भारत,🇮🇳 हा लवकरच सर्व विकसित आणि विकसनशील देशांना सुध्दा एकत्र आणून शास्वत विकासाकडे मार्गक्रमन करील.

    असा भारत🇮🇳, हीच आपल्या महात्मा ज्योतिबा फुले,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. , राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व पुरोगामी विचार या मातीत रुजविण्याचा अट्टाहास धरणाऱ्या सुधारकाना आदरांजली असेल..🙏🙏🙏🙏!!!!!


प्रलय भारत सावंत
   ०१.०८.२०२०







Comments

  1. अप्रतिम ,सुंदर लेख .मुद्देसुद मांडणी मुळे आशय लवकर समजला.💐💐👍👌

    ReplyDelete
    Replies
    1. आभारी आहे... प्रेरणा तुम्हीच दिलीत

      Delete
  2. उत्तम विचार आणि सखोल अभ्यास याचा सुरेख मिलाब 👌👌👌
    खूप छान प्रलय....🙏🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. आभारी आहे आपल्या अभि प्रया बदल

      Delete
  3. मुद्देसूद आणि थेट विषयाला हात घालणारा लेख

    ReplyDelete
  4. थेट अभिप्राय कळ वल्या बदल आभारी आहे😊🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  5. मांडणी चॅन जमलीये....उत्तरोत्तर सुधारणा होतीलच..शुभेच्छा

    ReplyDelete
  6. सुरेख, ही पायवाट लवकरच राजमार्ग होईल ही आशा

    ReplyDelete
  7. धन्यवाद सर.... आमच्या राज मार्गात तुमची भूमिका होकायंत्र प्रमाणे सदिश आहे.🙏🙏🙏

    ReplyDelete
  8. Khupch Chan mandani Keli.😍👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. 🙏🙏🙏 सर , तुमच्या च प्रोत्साहन मुळे

      Delete
  9. Replies
    1. खुप वेळ वाट बघत होतो.... आपल्या प्रतिक्रियाच..

      Delete
  10. Nicely written Pralay... Keep it up..

    ReplyDelete

Post a Comment